जेएनयुतील विद्यार्थ्यांना मनुष्यबळ विकास मंत्र्याचे आवाहन
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शुल्कवाढीचा मुद्दा निकाली निघाल्याने विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन थांबवावे, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी केले. जेएनयु विद्यार्थी आभि शिक्षकांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. या मुद्यावर स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचे पोखरीयाल अध्यक्ष होते.
या प्रकरणाशी सर्व संबंधीतांशी या समितीने चर्चा केली. त्यांनी जेएनयुतील वातावरण सुरळीत करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. याच प्रयत्नातून 10 आणि 11 डिसेंबर रोजी सर्व मान्य तोडगा काढण्यात आला, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
दारीद्य रेषेखालील विद्यार्थ्यांना होस्टेलच्या खोलीशुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे हिवाळी सत्रासाठी 50 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,असे ते म्हणाले. यापुढे आंदोलन र्सुूठेवल्यास त्याचे समर्थन करता येणार नाही,असे त्यांनी सांगितले.