नवी दिल्ली – राहुल शेवाळे यांनी आपला शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करणारी तरूणी ही दाऊद टोळीशी संबंधीत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता परंतु हा विषय आता त्यांच्यावरच बुमरॅंग सारखा उलटण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे हेच वारंवार कराचीला कशासाठी जात होते याची एनआयएने चौकशी करावी अशी मागणी या महिलेने केली आहे.
Suicide । सुसाईड नोटमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची नावे लिहून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या
एनआयएने माझाही पासपोर्ट तपासावा आणि माझीही चौकशी करावी मी आजवर कधी कराचीला गेले आहे काय हे एनआयएने तपासावे असे तिने म्हटले आहे. उलट राहुल शेवाळे हेच कराचीला जात असत ते नेमके तेथे कोणाला भेटत असत याचीही चौकशी झाली पाहिजे असे तिने म्हटले.
मी भारताची कन्या आहे. माझ्यावर असे बदनामीकारक आरोप करून राहुल शेवाळे हे स्वत:ची सुटका करू शकत नाहीत असेही तिने म्हटले आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओतून तिने शेवाळे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. सदर महिलेने म्हटले आहे की, राहुल शेवाळे यांनी दोन वर्ष माझ्याशी शारीरीक संबंध ठेवले, पण लग्नाचा विषय काढल्यानंतर त्यांनी मला धमकावयला सुरूवात केली. ते मद्यपान करून आपला शारीरीक व मानसिक छळ करीत असत असा आरोपही या महिलेने केला आहे.
या प्रकरणात आपण साकीनाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी अजून राहुल शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही असेही तिने म्हटले आहे. मी आजवर कधीही कराचीला गेलेली नाही. मी फॅशन डिझायनर आहे, दुबईत माझ्या व्यवसाय आहे. पण राहुल शेवाळे मात्र दुबई मार्गे पाकिस्तान व कराचीला जात असत त्याचीही चौकशी झाली पाहिजे असे तिने म्हटले आहे.