मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकाच मंचावर हजेरी लावली. निमित्त होत शिवाजी पार्क मैदानावरील मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे. तीन राजकीय नेते एका व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी यावेळी ही महायुतीची राजकीय नांदी समजायची का ? असा सवाल देखील विचारला.
शिवाजी पार्क येथे मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाला समस्त मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. परंतु मुख्य चर्चा होती ती म्हणजे तीनही नेते एकाच व्यासपीठावर आल्याची. कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी दिलेल्या निमंत्रणामुळे मी आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच या दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्यचे देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘दीपोत्सव २०२२’चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व श्री राज ठाकरे यांच्या सह आज केले.@mnsadhikrutचे पदाधिकारी, नेते, अनेक मुंबईकर यावेळी उपस्थित होते.@mieknathshinde @mnsadhikrut @RajThackeray
(1/2)#Mumbai #Maharashtra pic.twitter.com/HzCYvFmoQX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2022
खेळीमेळीच्या वातावरणात सोबत येऊन दिवाळी साजरा करण्याचा हेतू असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरेंनी भाजपला पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेली मागणी तसेच आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक यामुळे एकाच मंचावर तीनही नेते आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु शिंदे यांनी या कार्यक्रमाचा राजकीय अर्थ नको असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला.