नवी दिल्ली :- वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका, त्यानंतर आशिया करंडक व त्यानंतर विश्वकरंडक अशा सातत्याने स्पर्धा खेळत असलेल्या भारतीय संघातील नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
भारतीय संघातील रोहित व कोहली सातत्याने सामने व विविध स्पर्धा खेळत आहेत. त्यातच यंदा (ICC) आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा होत आहेत व त्यासाठी रोहित व कोहलीसह सर्व खेळाडू ताजेतवाने राहावेत हाच विश्रांती देण्याचा हेतू असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.