काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या ‘ॲटम बॉम्ब’ वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. ओडिशातील कंधमाल येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, हे मृत लोक देशाच्या मनाचीही हत्या करत आहेत. अशी काँग्रेसची वृत्ती नेहमीच राहिली आहे. काँग्रेस म्हणते की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. काँग्रेस घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने देशाचे मन मारत आहे’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,’ 26 वर्षांपूर्वी याच दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती आणि देशप्रेमाने भरलेले सरकार राष्ट्रहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या कल्याणासाठी काम करते हे आम्ही दाखवून दिले होते. आशा लोकांसाठी कशी काम करते? एक दिवस असा होता की भारताने आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली. दुसरीकडे, काँग्रेस आहे जी वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. ते म्हणतात शांत बसा, पाकिस्तानकडे अनु बॉम्ब आहे.’ असं म्हणत मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून मोदींनी निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मणिशंकर अय्यर?
मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचा आदर करण्यास सांगितले होते. ते म्हणाले, ‘पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे आणि त्याचा आदरही आहे. तो आदर जपताना त्यांच्याशी हवं तसं कठोरपणे बोला, पण निदान बोला. तुम्ही बंदुका घेऊन फिरताय, त्यातून काय उपाय मिळतोय, काहीच नाही. तणाव वाढतच जातो. कोणीही वेडा आला तर देशाचे काय होईल? त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. आमच्याकडे आहे. पण लाहोर स्टेशनवर एखाद्या वेड्या माणसाने अणुबॉम्बचा स्फोट केला तर भारत 8 सेकंदात नष्ट होऊ शकतो. पाकिस्तानशी बोलून त्याचा आदर केलात तर तो बॉम्बचा विचार करणार नाही पण तुम्ही तो फेटाळून लावला. आपण समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानसोबतचा प्रश्न सोडवावा लागेल.
हे वाचाल का ? मोदींची ऑफर शरद पवारांनी नाकारली म्हणाले,’अशा लोकांसोबत…’