नवी दिल्ली – देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढण्याची गरज आहे. यासाठी टाटा मोटर्स पुढाकार घेणार आहे. या दृष्टिकोनातून 2025 पर्यंत टाटा मोटर्स दहा नवी इलेक्ट्रीक वाहने बाजारात उपलब्ध करणार असल्याचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष यांची एन ंद्रशेखरन यांनी सांगितले.
भागधारकांना लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखरन म्हणाले की केवळ वाहने पुरवठा करून चालणार नाही. यासाठी देशात चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे. त्यासाठी टाटा मोटर्स मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे. देशात एकूण वाहनापैकी इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण केवळ दोन टक्के आहेत.
ते आपल्याला अधिक वेगात वाढवावे लागणार आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनाबरोबरच इंधनाची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. टाटा मोटर्सच्या ताफ्यातील जग्वार लॅंड रोव्हर कंपनी 2025 पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रिक स्वरूपातच उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कंपनीचे कामकाज 150 देशात चालते.