नवी दिल्ली – टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत दोन टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1ऑक्टोबरपासून होणार आहे.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. पोलाद आणि इतर धातूंच्या किमती वाढूनही गेल्या काही महिन्यापासून दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती.
मात्र आता दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. याअगोदर मारुती सुझुकी, हिरो मोटो कार्पो या कंपन्यांनीही दरवाढ जाहीर केलेली आहे.