पुणे – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना ही त्यांच्या मुलाच्या बाबतीत घडली होती.
मुंबईत झोपडपट्टीतील मुलाने लोकलवर मारलेल्या दगडाने श्रीराम आणि दीपा लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागू दाम्पत्यांनी “रुपवेध प्रतिष्ठान’ची स्थापना करून त्याच्या नावे “तन्वीर सन्मान’ पुरस्कार देण्याला सुरूवात केली. यामध्ये ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी यांच्याशिवाय तरुण उभरत्या कलाकारांनाही या पुरस्काराने सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते.