पुणे, दि. 18 – संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे प्रभावी संवाद असतो, असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजीत कार्यशाळेत “महिला सुरक्षा’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, शेलार गुरुजी, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, विद्या होडे, शर्मिला येवले, आश्लेषा खंडागळे, ज्योती चांदेरे उपस्थित होते.
औषधे घेताना घ्यावयाची काळजी, परिणाम आणि वितरण याचे मार्गदर्शन जेहलम जोशी यांनी केले. हवामान बदलांचा होत असलेला परिणाम आणि समाजाची जबाबदारी काय याची जाणीव अपर्णा पाठक यांनी करून दिली. अन्न पदार्थांतील भेसळ कशी ओळखावी यावर अन्न व औषध पुरवठा विभागाचे अधिकारी शीतल घाटोळ, अर्चना झिंजूर्णे यांनी मार्गदर्शन केले. शहरातील नागरी समस्यांवर प्रा. विद्या होडे तर शर्मिला येवले यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत मिळावी याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सुरक्षेसाठी शहरात आरोग्य विषयक फवारणी करण्यात यावी असा ठराव ज्योती चांदेरे यांनी मांडले. सूत्रसंचालन अनिता शिंदे तर शेलार गुरुजी यांनी आभार मानले.