नगर – महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका मनपाने स्वयंभू ट्रान्सपोर्टला दिला असून, स्वयंभूने मात्र रस्त्यावरील कचरा उचलण्यास विरोध दर्शविला आहे. कचरा संकलनाचे व वाहतुकीचे काम स्वयंभूचे आहे. त्यामुळे मनपा रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी पुन्हा दुसरा ठेकेदार नेमणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकने तीन वर्षांसाठी शहर स्वच्छतेचा ठेका पुण्याच्या स्वयंभू या संस्थेला दिला. त्यासाठी महापालिका दररोज टनामागे 1 हजार 650 रुपये प्रमाणे दररोज स्वयंभूला 2 लाख 14 हजार रुपये मोजते आहे. मात्र शहरात काही ठिकांणी कचरा तसाच दिसत असल्याचे दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, याबाबत पाठपुरावा केला असता स्वयंभूकडून सांगण्यात आले की, शहरातील कचरा संकलनाचे व वाहतुकीचा ठेका घेतला आहे.
नागरिक कचराकुंड्याऐवजी इतरत्र कचरा टाकत असल्याने शहरातील काही भागात कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकाहद्दीत शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील लोकसंख्याप्रमाणे कचऱ्याचे गणित काढले जाते. त्यानुसार प्रति व्यक्ती 300 ग्रॅम असे चार लाख लोकसंख्यासाठी दररोज शहरात 120 ते 140 टन कचरा शहरात साचला जातो.
त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट या खाजगी संस्थेला ठेका देण्यात आला असून सध्या या ट्रान्सपोर्ट कडून 55 वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येते. त्यासाठी मनपा या ठेकेदाराला 1 हजार 650 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहे. स्वयंभूने ही शहरात कचरा संकलन करण्यासाठी 40 घंटागाड्या, 10 कंटेनर, 5 कॉम्पॅक्टरद्वारे कचरा उचलला जात आहे. मात्र रस्त्यावर पडलेला कचऱ्यासाठी महापालिकेला पुन्हा नवीन ठेकेदार द्यावा लागणार आहे.
कचऱ्याबाबत महापौरांनी घेतले नमते
स्वयंभूला कचरा संकलन करण्याचा ठेका दिला आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घंटागाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटागाड्यातच टाकावा असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. तसेच यापुढे शहरच कचराकुड्यामुक्त करायचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा हा घंटागाड्यातच टाकावा. शहरातील ठिक ठिकाणी पडलेला कचरा उचलण्याचे काम ठेकेदाराकडे नाही. सध्या पडलेला कचरा मनपा कर्मचारी उचलतील असे ही त्यांनी सांगितले.