संगमनेर – केंद्र सरकारने आणलेल्या सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ संगमनेर शहारात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थाचा सहभाग होता. साडेतीनशे फूट लांबीचा तिरंगा या रॅलीचे आकर्षण ठरला.
संगमनेर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातून मोर्चाला सुरवात झाली. बाजारपेठ, पाटील चावडी, मुख्य रस्ता, नाशिक-पुणे महामार्ग, सावरकर मार्ग (लिंक रोड) येथून हा मोर्चा नवीन नगर रस्ता येथे आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. साडेतीनशे फुट लांबीचा तिरंगा घेऊन शहरातून विविध ठिकाणाहून हा मोर्चा निघाला होता. तसेच मोर्चात सुरवातीला महिला, मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जयजय श्रीराम, जहॉं हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, आमचे समर्थन सीसीए’ ला, नागरिकत्व सुधारणा यावेळी विचारवंत प्रा. एस. झेड. देशमुख आदींची भाषणे झाली.
देशाच्या संरक्षणार्थ अंगावर खादी वर्दी घातलेल्या पोलीस उपाधीक्षक रोषण पंडित आणि संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांचा मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते सत्कार करून खाकी वर्दीचा गौरव करण्यात आला. मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, पतित पावन संघटना, शिवजयंती उत्सव युवक समितीसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते.