Maharashtra Weather| पुण्यासह राज्यात अनेक शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाल्याने रात्रीचाही उकाडा जाणवत आहे. त्यात पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये 42 अंश सेल्सिअस, 43 अंश सेल्सिअस पर्यंत गेले मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी पण आपल्या चाळीसच्यावर आकडे जाताना दिसतात, तर सर्वसाधारणपणे गेल्या काही एक दिवसापासून हिट वेव्हची सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर आज पुण्याचे तापमान 39 अंश सेल्सिअस आहे. Maharashtra Weather|
येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी 12 ते दुपारी 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल तर बाहेर पडू नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार Maharashtra Weather|
वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील. पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नसून, पाच ते नऊ एप्रिल मध्य महाराष्ट्रात 8 एप्रिल मराठवाड्यात 6 ते 9 एप्रिल विदर्भात, 9 एप्रिल कोकण गोव्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
7 एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि 7 एप्रिलला विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवाान खात्याने व्यक्त केला आहे. पुण्यात पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील 9 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: