मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला महिना होत आला असतानाच दोन्ही देशांना युद्धाचा त्रास जाणवू लागला आहे जरी रशियाच्या भूमीवर युद्ध लढले जात नसले तरी त्यांनाही या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी महागाई चे भोग आले असून साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तब्बल 31 टक्के वाढ झाली आहे.
ही किंमत आणखी वाढायचा धोका लक्षात घेऊन लोकांनी साखरेचा साठा सुरू करण्यास प्रारंभ केल्याने सरकारने आता साखरेच्या पुरवठ्यावरही निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे एका नागरिकाला फक्त दहा किलो साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे रशीयातील सर्व शहरांमधील सुपर स्टोअर्समध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत गेल्या कित्येक वर्षात प्रथमच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सात टक्के ते दहा टक्के वाढ झाल्याचे लक्षात आले आहे.
रशियन सरकारने मात्र सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला आहे नफेखोरांच्या कृत्रिम कृत्रिम टंचाईमुळे साखरेचे दर वाढले असून अशा नफेखोरावर आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे म नागरिकांना मात्र महागाईचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी या सर्व प्रक्रियेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार धरले आहे.