मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाते. या मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. या मालिकेतील दत्ता, सुष्मा, अभिराम, छाया, दत्ता, वच्छी, पांडू, अण्णा नाईक, माई, शेवंता यांची रहस्यमय कहाणी नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
दरम्यान, आता पुन्हा एकदा या रहस्यमय कहाणीचे आणखी एक पान उलगडण्याची वेळ आली आहे. स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत आले आहेत. नाईकांच्या वाड्यातलं गूढ हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवतं आणि आता अण्णा नाईकच परत आले म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर नवा ट्विस्ट निर्माण होणार हे नक्कीच.
View this post on Instagram
नुकतंच ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मलिकेतचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये माई आणि माधवची अवस्था पाहून प्रेक्षकांना खूप दया आली आहे. माईंचे वय झाले असून त्या मोलकरणीची कामे करत आहेत. त्यांनी वाडा न विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजही आपली मुले परत येतील, याची आस लावून बसल्या आहेत. तर माधवला वेड लागले असून तो भिका मागत रस्त्यावर फिरताना दिसतो आहे.
View this post on Instagram
अण्णा नाईकांच्या पापांमुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची पुरती वाट लागल्याचे यामध्ये दिसून येत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.