कोलकाता – प. बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात घमासान सुरू असली आणि सत्ता काबिज करण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी या राज्यातील जनतेच्या मनावर अजुनही ममतांचेच राज्य चालते असा दावा एबीपी सी वोटरने केला आहे. राजकीय वर्तुळात प्रचारा दरम्यान दोन्ही पक्ष एकमेकानांवर टीका करतांना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रचाराला वेग आला आहे.
Didi hasn’t been able to answer those who were first destroyed by Amphan & later by ‘tolabaaz’ of TMC. The relief sent to Bengal by Centre got stuck in the ‘Bhaipo window’. Didi, Bengal wants to know who looted the relief for Amphan?: PM Modi in Contai#WestBengalElections2021 pic.twitter.com/tdHb78hrqh
— ANI (@ANI) March 24, 2021
यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, कांथी येथे जनसभेला संबोधित केले. यादरम्यान शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांथी येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला असून, ‘दीदी ओ दीदी तुमच्या पापांचा घडा भरलाय. ममता दीदी यांच्या कुशासनाची शिक्षा आता जनताच देईल, अशी टीका मोदी यांनी केली.’
ते पुढे म्हणाले,’संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात पश्चिम बंगालचे विशेष महत्त्व आहे. बंगालच्या योगदानाला पुढील पीढीपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप करेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
तत्पूर्वीही, ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’ प्रचारवेळी ममता बॅनर्जींवर जळजळीत टीका केली होती.