पुणे : बारावीच्या परीक्षेत अपयश आल्याने कोथरूड येथील श्रावणधारा वसाहतीमधील विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे.
निखील लक्ष्मण नाईक (वय 19) असे या मुलाचे नाव आहे. तो शांत स्वभावाचा होता.बारावीच्या परीक्षेत यश मिळवून क्रिकेटर होण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, निकाल लागला आणि निखिलने घेतलेला चुकीचा निर्णयामुळे नाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
निखिलचे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखीलला एक बहीण आहे. तो गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाइन निकाल लागणार हे समजल्यावर तो उत्सुक होता. मात्र, नापास झाल्याचे समजताच त्याने टोकाचे पाऊल उचलले. यावेळी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे (30) यांच्या अंगावर तो पडला. निखीलचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये लोणारे यांच्या पायाला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे.