नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभाविप तसेच डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. या संघर्षामध्ये काही विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. विद्यापीठाच्या कावेरी वसतीगृह खानावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जात होते. त्याला मज्जाव करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वक्तव्य जारी केले आहे. अतिरेक्यांच्या माध्यमातून अपप्राचार केला जातोय असे या वक्तव्यामध्ये म्हटले आहे. प्रत्येकाला जेवणाचं स्वातंत्र्य आहे असं सांगताना वाद रामनवमी साजरी करण्यावरुन झाल्याचं ते म्हणाले आहेत. काही विद्यार्थी रामनवमीनिमित्त पूजा करत असतानाच डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. त्यामुळे झटापट झाली असून मारहाण झालेली नसल्याचा दावा बन्सल यांनी केला आहे.
अभविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार रामनवमीच्या पूजेचे आयोजन केले असता त्या ठिकाणी डव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन केले. याच रागामधून अभविप आणि डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांमधील काही लोकांना किरकोळ मार लागला आहे.
Delhi | A scuffle broke out between two groups in JNU over allegedly eating non-vegetarian food
ABVP has gone on rampage in JNU as other students resisted their attempt to ban non-veg food. 50-60 people are injured, says Sarika a PhD student & former vice president of JNUSU pic.twitter.com/yED7K4OtTA
— ANI (@ANI) April 10, 2022
जेएनयूमध्ये अभविपच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मांसाहार बंदीला विरोध केल्याने हा गोंधळ झाला अशून ६० ते ६० जण जखमी झालेत असं पीएचडीची विद्यार्थीनी असणारी आणि जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष सारिका हिने म्हटलंय.
तर अभविपच्या जेएनयूमधील संघटनेचे अध्यक्ष रोहित कुमार यांनी, “डाव्या आणि एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पूजेदरम्यान गोंधळ घातला. या गोंधळाचा मांसांहारी जेवणाशी कोणताच संबंध नाहीय. त्यांना रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाशी अडचण होती,” असे रोहित कुमार यांनी म्हटले आहे. माहराण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटांनी वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले.
#WATCH | A group of JNU students reaches the Vasant Kunj North Police Station in Delhi, amid a scuffle that broke out between two groups in the university over allegedly eating non-vegetarian food. pic.twitter.com/gR9A9HALmL
— ANI (@ANI) April 10, 2022
जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष साई बाला यांनी कावेरी वस्तीगृहामध्ये अभविपच्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना मांसांहारी पदार्थ खाण्यापासून रोखलं. नवरात्रीमध्ये मांसांहारी पदार्थ यापूर्वीही खाऊ देण्यात आले नव्हते असंही साई यांनी रविवारी विद्यापिठात झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ ट्विट करत म्हणालेत.
“अभविपच्या गुंडांनी कावेरी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना मांसांहारी पदार्थ खाण्यापासून रोखलं. जेएनयूचे कुलगुरु या गुंडगिरीचा निषेध करणार का? त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी जेवण करायचं का? खानावळीच्या सचिवालाही अभविपने मारहारण केलीय. या गुंडगिरीविरोधात उभं राहण्याची वेळ आलीय. हा भारताच्या विचारसणीवरील हल्ला आहे,” असं एन साई बाला यांनी म्हटलंय.