रायगड – अतिवृष्टीमुळे दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील तळीये गावच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या गावासह आणखी दोन वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 13 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तळीये गावासह दोन वाड्यांच्या पुनर्विकासाच्या भूसंपादनासाठी 3 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक सोयीसुविधांसाठी 9 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ही मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 53हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.