नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निकालावर योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदेव बाबा म्हणाले कि, श्रीरामाचा वनवास आता संपला आहे. अयोध्येत राम मंदिर बनेल. यावेळी आपल्याला अराजकीय तत्त्वांपासून सावधान राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्यासह देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. तसेच सोशल मीडियावरून निकाला संदर्भात टीका-टिप्पणी व अफवा परसविणाऱ्या संदेश पाठविणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनीही देशवासियांना शांततेचे आव्हान केले आहे.