नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांना अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागादेखील देण्याचा निर्णय आज न्यायालयाने दिलाआहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे परंतू, आपण समाधानी नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच आम्ही वकिलांशी चर्चा करून पुनर्विचार याचिका दाखल करायची की नाही याचा विचार करणार असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
Zafaryab Jilani, All India Muslim Personal Law Board: We will file a review petition if our committee agrees on it. It is our right and it is in Supreme Court’s rules as well. #AyodhyaJudgment https://t.co/ICu8y7fOzI pic.twitter.com/iAoOIcjMTz
— ANI (@ANI) November 9, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले असले तरी बोर्ड या निर्णयावर समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही या निर्णयाचा आदर करतो पण आम्ही त्यावर समाधानी नाही.” आम्ही पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. संपूर्ण राष्ट्राचे आवाहन शांतता कायम राखण्याचे आहे. कुठेही कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन होऊ नये. जर आमची समिती सहमत असेल तर आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू. हा आमचा हक्क आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या अधीन असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.