नवी दिल्ली – येत्या 1 मे पासून तुम्हाला अनावश्यक मेसेज आणि कॉल्सपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. फेक कॉल्स आणि फसवणूक करणारे संदेश यांचे प्रमाण वाढल्याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या संस्थेद्वारे टेलिकॉम कंपनीसाठी नवे नियम तयार केले आहेत. सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे एआयचा वापर केला जात आहे.
त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर बनावट कॉल्स आणि मेसेज रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर्स वापरण्याचे आदेश दिले आहेत. एअरटेल कंपनीने हे फिल्टर वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिओ पुढील काही महिन्यांमध्ये ते लागू करणार असून मे महिन्यापासून भारतात AI फिल्टर्स वापरण्यावर सक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन किंवा कॉल्सच्या मदतीने ग्राहकांना फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. हे गैरप्रकार थांबावेत यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण विभागाने हा निर्णय घेतला आहे.