नवी दिल्ली : जर तुम्हाला स्पॅम कॉल्स अन् फेक मॅसेजसचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अशा स्पॅम कॉल्स आणि फसव्या तसेच बनावट संदेशांपासून लवकरच सुटका आहे. कारण दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याविषयी माहिती देत नवीन दूरसंचार विधेयक लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्हाला जेव्हा XYZ बँकेकडून कॉल करत आहे, असे कॉल समोरून येतात, तेव्हा तुमची फसवणूक होऊ शकते, तसेच काही जणांना अनोळखी नंबरवरून धमक्या येतात. म्हणून युजर्सच्या संरक्षणासाठी आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी या विधेयकाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन दूरसंचार विधेयक सहा ते दहा महिन्यांत आणले जाऊ शकते परंतु सरकारला त्याची घाई नाही असे त्यांनी म्हटले.
टेलिकॉम बिल-2022 च्या मसुद्यानुसार, ‘ओव्हर-द-टॉप’ अॅप्स जसे की ‘कॉलिंग’ आणि ‘मेसेजिंग’ सेवा प्रदान करणाऱ्या व्हॉट्सअॅप, झूम आणि Google Duo यांना ऑपरेट करण्यासाठी परवाना आवश्यक असू शकतो. या विधेयकानुसार, सर्व इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंग अॅप्सना केवायसी तरतुदीचे पालन करावे लागेल. असं वैष्णव म्हणाले. प्रथम प्राधान्य युजर्सच्या सुरक्षिततेला आहे आणि प्रत्येक ग्राहकाला कॉल कोण करत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.
तंत्रज्ञानाने इतके बदल केले आहेत की व्हॉईस कॉल आणि डेटा कॉलमधील फरक समजत नाही, तसेच केवायसी नियमांमुळे सायबर फसवणूक रोखण्यात मदत होईल. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, विधेयकाच्या अंतिम अंमलबजावणीबद्दल विचारले असता वैष्णव म्हणाले, “विचारविनिमय प्रक्रियेनंतर आम्ही अंतिम मसुदा तयार करू, जो संबंधित संसदीय समितीसमोर जाईल.” त्यानंतर तो संसदेत आणला जाईल. मला वाटते सहा ते दहा महिने लागतील, पण आम्हाला कसलीही घाई नाही.