नवी दिल्ली- लाॅकडाऊन जाहीर करण्याच्या आधी सरकारने कोणतीही पुर्वतयारी केली नाही. तयारी नसताना लाॅकडाऊन जाहीर केलं. त्यामुळे आज तुमच्या या निर्णयाचा गरीब आणि मजूरांना त्रास भोगावा लागतो आहे, असा खडेबोल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला लगावला.
सरकारच्या या निर्णयामुळे सर्व स्तरावरील लोकांना त्रास होतो आहेत. त्यात सामान्य जनतेला अनेक आर्थिक फकटाही बसला आहे, असंही त्या म्हणल्या.
दरम्यान, लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहीलं होतं. त्यात लाॅरडाऊनसंदर्भात अनेक सुचनाही दिल्या होत्या. आम्ही लाॅकडाऊनमध्ये सरकारला साथ देऊ असंही त्यात लिहीलं होतं.