मुंबई – जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा, तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा करोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा देखील रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आशिया चषक स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये होणार होती. पण भारताच्या विरोधानंतर ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्याचे ठरले होते. या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खूप कालावधीनंतर सामना होणार होता. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिने आशिया स्पर्धेला महत्त्व निर्माण झाले होते.