नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. मणिपूर हिंसाचाराने देशाच्या अंतरात्म्यावर खोलवर जखम झाली असल्याची व्यथित भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेसने सोशल मीडियावरून सोनियांचा व्हिडीओ संदेश जारी केला. सोनियांनी मणिपूर हिंसाचार यातनादायी असल्याचे म्हटले. हिंसाचारामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले. अनेकांना घर सोडून पलायन करावे लागले याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.
The unprecedented violence that has devastated the lives of people in Manipur has left a deep wound in the conscience of our nation.
I am deeply saddened to see the people forced to flee the only place they call home.
I appeal for peace and harmony. Our choice to embark on the… pic.twitter.com/BDiuKyNGoe
— Congress (@INCIndia) June 21, 2023
मणिपूरमधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व मिळून आताच्या संकटातून बाहेर पडू, असे सोनिया गांधी म्हणाल्या. मणिपूरमधील स्थितीवरून विरोधी पक्ष आणि विशेषत: कॉंग्रेस सातत्याने सत्तारूढ भाजपला घेरत आहे. त्या स्थितीला भाजपचे विभाजनवादी राजकारण जबाबदार आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्यात त्या पक्षाच्या केंद्र आणि राज्य सरकारांना अपयश आले आहे, असा कॉंग्रेसच्या टीकेचा सूर असल्याचे पाहायला मिळाले.