Narendra Modi on Opposition : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आजपासून सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद परिसरात बोलताना विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. आज अधिवेशनापूर्वी बोलताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता काही लोक सवयीनुसार गोंधळ घालतात. मात्र असा गोंधळ करणाऱ्यांनी एकदाआत्मपरीक्षण करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
अधिवेशन सुरु होण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसमोर आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनविषयी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले- २०२४ सालासाठी तुम्हा सर्वांना राम-राम! संसदेच्या या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी एका खासदाराने अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे नारीशक्ती वंदन कायदा. त्यानंतर आपण सर्वानी २६ जानेवारीला देशाच्या कर्तव्य पथावर देशाच्या नारी शक्तीच्या , शौर्याची आणि दृढनिश्चयाची शक्ती देशाने अनुभवली आहे. त्यानंतर आज आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, त्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्या नर्मला सीतारामन यांचे अंतरिम अर्थसंकल्प, एक प्रकारे हा शक्ती साक्षात्काराचा पर्व आहे.
#WATCH | PM Modi targets the disruptive Members of Parliament
“I hope the MPs who are in the habit of ripping apart democratic values will self-introspect on what they did in their term as members of Parliament. Those who contributed positively to the Parliament will be… pic.twitter.com/oPlxsYj6o8
— ANI (@ANI) January 31, 2024
विरोधी पक्षनेत्यांच्या गोंधळाचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले, “सर्व खासदारांना आठवणार नाही. टीका धारदार असू शकते पण गदारोळ होता कामा नये. गदारोळ करणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही. आता शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन.सर्वांना त्यांचे मत मांडण्याची संधी आहे.अशा परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे.काही लोक सवयीने गोंधळ घालतात.पण त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन ही त्या खासदारांसाठी पश्चातापाची संधी आहे. चांगली पाऊले टाकण्याची ही संधी आहे. आज ही संधी जाऊ देऊ नका. देशहिताच्या विचारांचा लाभ सभागृहाला द्या. देश जल्लोषात आणि उत्साहात आहे. “निवडणुकीची वेळ जवळ आली असताना पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही, नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्पही आम्हीच आणू असा माझा विश्वास आहे. असे त्यांनी म्हटले.