मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
आमच्या महाराष्ट्रात “योगी’ कुणीच नाहीत. आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. ठाकरे सरकारवर केलेल्या या टीकेवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करत निशाणा साधलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी “कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे.” असं ट्विट केलं आहे. सध्या हे ट्विट सोशलवर चांगलंच चर्चेत आले आहे. आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर ‘कुणी मानसिक रोग’ अशी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
कोणी योगी आहे
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022