पुणे – साखरेच्या भावात कारखानदारांनी क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ केली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. साखर कारखान्यांकडून शासनाकडे दोन रुपये वाढीची मागणी होत असल्याने साखरेचे भाव 42 रुपयांपर्यंतही जाऊ शकतात, असे साखरेचे व्यापारी विजय गुजराती यांनी मंगळवारी सांगिले.
घाऊक बाजारात क्विंटलच्या भावात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीनंतरही साखर कारखानदारांनी शासनाकडे प्रतिकिलोमागे दोन रुपयांची वाढ मागितली आहे. या वाढीला शासनाने मान्यता दिल्यास घाऊक बाजारात पुन्हा क्विंटलचे भाव 200 रुपयांनी वाढतील.
सद्यस्थितीत व्यापाऱ्यांना 3100 रुपये क्विंटलने साखर मिळते. मात्र, साखर कारखानदारांची भाववाढीची मागणी मान्य झाल्यास क्विंटलचा दर 3300 रुपयांवर जाईल. परिणामी, किरकोळ बाजारातील किलोचा दर 42 रुपयांपेक्षा अधिक होऊ शकतो.