मुंबई – राज्यातील मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज झालेल्या नुकसानीचा आढावा घेत याबाबतची माहिती दिली आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती
यंदाच्या पावसाळ्यात ४३६ मृत्यू, पैकी ६ जणांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाही. १३६ जण जखमी.
उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव येथे आपत्ती निवारण दलातर्फे मदतकार्य.
उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरद्वारे १६ तर बोटीद्वारे २० जणांना वाचवण्यात यश.
लातूरमध्ये हेलिकॉप्टरने ३ तर बोटीद्वारे ४७ जणांचे प्राण वाचवण्यात यश.
औरंगाबादमध्ये २४ लोकांना बोटीद्वारे वाचवण्यात यश.
या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २६ जण जखमी झाल्याची नोंद आहे.
लहान मोठे सर्व प्रकारच्या ५७ जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर १९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.
१७ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असून आत्तापर्यंत ८१ टक्के पंचनामे पूर्ण. पावसामुळे १९ टक्के पंचनामे बाकी.
हे नुकसान गुलाब चक्रीवादळापूर्वीचं आहे. २२ लाख हेक्टर शेती उध्वस्त झाल्याचा अंदाज.
१२७ ठिकाणी चार वेळा तर काही ठिकाणी आठ वेळा अतिवृष्टी.
वीजपंप, रस्ते, पूल वाहून गेले.