मुंबई – मनसेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची घोषणा करण्यात आली आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे म्हणाले कि, काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेंव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला?, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
कोणालाही आपण मंत्री झालो आहोत असे वाटू नये यासाठी इतक्या जणांना कॅबिनेटमध्ये घेतलं आहे. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू, असेही ठाकरेंनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू
#मनसे_वर्धापनदिन #राज_ठाकरे_लाईव्ह— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020
गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?
#मनसे_वर्धापनदिन #राज_ठाकरे_लाईव्ह— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020