वाॅशिंग्टन – महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. नवीन रुग्णसंख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अशावेळी राज्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या वातावरणात नागरिकांना दिलासा कधी मिळेल या विषयावर मुळ महाराष्ट्राचे नागरिक असलेले अमेरिकन डाॅ. रवी गोडसे यांनी लाईव्हद्वारे माहिती दिली आहे.
1 July – end Pandemic. 2 October- shed masks. 3 rd wave- bye bye.
— DrRavi (@DrGodseRavi1) May 26, 2021
डाॅ. रवी गोडसे म्हणाले, नागरिकांनी सकारात्मक राहायला हवे. भारत सरकारने या पाच सूचनांचे पालन केल्यास येत्या 1 जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपणार, ऑक्टोबरपर्यंत लोकांनी मास्क वापरायची गरज भासणार नाही तसेच भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
डाॅ. रवी गोडसे यांनी सांगितलेल्या पाच सूचना पुढीलप्रमाणे:
1. जनतेला कोरोनाबद्दल दररोज अधिकृत माहिती द्या.
- जेवढ्या काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.
-
देशातील खासगी क्षेत्रालाही लसीकरण असेल वा कोरोनाचे उपचार करण्याची परवानगी द्या
4. प्रोटोकॉलनुसार मोनोक्लोनल प्रक्रियेला परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. अमेरिकेत मोनोक्लोनलला गेल्या वर्षीच परवानगी देण्यात आली आहे.
5. लाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचं लसीकरण करा.
दरम्यान, नागरिकांनी करोनाची भिती न बाळगता उपचार सुरु ठेवले पाहिजे. भितीमुळे मन कमजोर होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. करोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना करोना झाला तरी मृत्यू होत नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगबरोबरच जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, असेही डाॅ. गोडसे म्हणाले.