नगर -संपूर्ण देशात जैन समाजाचा पवित्र चातुर्मास सध्या सुरु आहे. याच काळात 15 ते 24 ऑगस्ट दरम्यान पर्युषण पर्व आहे. या काळात मोठ्या प्रमाणात धार्मिक आराधना, तप, जाप, पूजाअर्चा होते.
त्यामुळे या काळात नगर शहरातील सर्वच कत्तलखाने बंद ठेवावीत, अशी मागणी श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाने जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्माचे पर्युषण काळात सर्व कत्तलखाने, मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर व जिल्ह्यातील कत्तलखानेही पर्युषण महापर्व काळात बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी श्री श्वेतांबर संघ कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाषलाल मुथा यांनी केली आहे.