पालघर – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोविड-19 विषयक नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून आयोजकांवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलघर पोलिसांनी आज ही माहिती दिली.
राणेंची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी पालघरमध्ये आली होती. त्यावेळी कोविड-19 विषयक नियम आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याबद्दल माणिकपूर, तुलिंज, काशिमीरा, वालिव, वसई आणि विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या यात्रेच्या आयोजकांवर भारतीय दंड संहिता, साथरोग प्रतिबंधक कायद्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.