मुंबई – भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत ऑलिम्पिक पदकांसह जागतिक स्तरावर होत असलेल्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
आता तिने सर्वात मानाची समजली जात असलेली ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकावी म्हणजे तिच्या यशाचे वर्तुळ पूर्ण होईल, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू व ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते खेळाडू प्रकाश पदुकोन यांनी व्यक्त केले आहे.