पुणे – मुंबई हायकोर्टाने सर्व विद्यापीठांना शिक्षणमंत्री आणि विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंमध्ये झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे परीक्षा पद्धतीचे एकसमान पालन करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत एकसमानता येण्याची चिन्हे आहेत.
याचिकाकर्त्याने उद्यापर्यंत सरकारला निवेदन पाठवण्याचे निर्देश दिले आणि 1 जून रोजी बैठक घेऊन सरकारने त्यावर निर्णय घ्यावा.
सरकारच्या निर्णयाचे विद्यापीठांनी पालन करावे. महाराष्ट्रातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठे यश मानले जात आहे.
दरम्यान, राज्यातील विविध विद्यापीठांतील परीक्षेच्या पद्धतीत एकसमानता आणि निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात सोमवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने आज निर्देश दिले आहे.
तथापि, काही विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला, पण ती एमक्युसी पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच परीक्षांमध्ये कोणत्याच विद्यापीठात एकसमानता नव्हती. आता मात्र न्यायालयाच्या निर्यायाने परीक्षा पदधतीत एकसमानता येणार आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये कुठेही एकसमानता येताना दिसत नाही. त्याचा परिणाम परीक्षा, निकालास उशीर लागणार असून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशास अडचणी निर्माण होणार आहे. म्हणूनच आम्ही राज्यातील विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मदतीने परीक्षामंध्ये एकसमानता असावी याकरता न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. कल्पेश यादव, सहसचिव, युवा सेना