कोलोंबो – श्रीलंकेत अध्यक्ष गोटाबाये राजपक्षे यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी सह्यांचे अभियान सुरू केले आहे. सरकारविरोधात अविश्वास ठराव आणावा या मागणीसाठी समागी जन बलवेंगया या प्रमुख विरोधी पक्षाच्यावतीने हे सह्यांचे अभियान राबवण्यात येत आहे.
सरकारने देशाच्या आर्थिक स्थितीबाबत संसदेमध्ये निवेदन सादर करावे, अशी मागणी समागी जन बलवेंगा पार्टीचे नेते सजिथ प्रेरणादासा यांनी संसदेमध्ये केली आहे. तसेच देशातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याची माहितीही संसदेमध्ये द्यावी, तसेच कर्ज परतफेड करण्यासाठी आर्थिक सल्लागारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही प्रेरणादासा यांनी केली आहे.
दरम्यान सध्याच्या काळात कर्ज परतफेड करायची की देशवासियांना काही खायला द्यायचे का नाही, हा प्रश्न अधिक तीव्र असल्याचे अर्थ मंत्री अली साबरी यांनी म्हटले आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे काही मदत मागण्याचा पर्याय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.