कोलकाता :- विरोधी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाचा मणिपूर दौरा हा केवळ एक दिखावा आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.
शनिवारी सकाळी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा पूर्वीच्या सरकारच्या काळात मणिपूर जळत असे, तेव्हा आता मणिपूर दौऱ्यावर गेलेले लोक संसदेत एक शब्दही उच्चारत नव्हते.
यूपीएच्या काळात जेव्हा मणिपूर महिनोनमहिने बंद असायचे तेव्हा ते एक शब्दही बोलले नव्हते असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, या संदर्भात, माझी कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना विनंती आहे की, त्यांनी तेच शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये आणावे, जिथे महिलांवर अत्याचार होत आहेत. तसेच हा गट राजस्थानला भेट देईल काय असा सवालही त्यांनी केला. आम्ही त्या राज्यांतील महिलांच्या स्थितीचा आवाज उठवू, असा निर्धारही अनुराग ठाकूर यांनी केला आहे.