नुकसानग्रस्त शेतकरी
श्रीगोंदा -57 हजार 370, कोपरगाव -57 हजार 336, पाथर्डी-54 हजार 435, नेवासा-53 हजार 500, शेवगाव-52 हजार 435, जामखेड -30 हजार 442, श्रीरामपूर-30 हजार 150, नगर -29 हजार 343, अकोले-27 हजार 309, राहता-26 हजार, संगमनेर-23 हजार 935, कर्जत-15 हजार 665, पारनेर – 5 हजार 755.
नगर – जिल्ह्यात सर्वाधिक सरासरीची आकडेवारी गाठत 156.96 टक्के पाऊस पडला. मात्र जाता जाता खरिपातील काढणीस आलेल्या पिकांची नासाडी केल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. मात्र रब्बी हंगामातील पिकांना दिलासा दायक वातावरण निर्माण झाली आहे. दरम्यान कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजा नुसार सुमारे 3 लाख 64 हजार 14 हेक्टर क्षेत्रावरील वरील पिकांना फटका बसला आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने सोयानीन, बाजरी, कपाशीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून त्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. तर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पिकांची स्थिती चांगली आहे. या रब्बी हंगामात रब्बी ज्वारीची 58 टक्के रब्बी तृण धान्याची 50 टक्के आणि एकुण रब्बी अन्नधान्याची 41 टक्के इतकी पेरणी झाली आहे.
गेल्या पंधरवड्यात पावसाने हाहाकार माजविला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जावून काम करणे श्क्य झाले नाही.त्यामुळे. सोयाबीनच्या शेंगा, कपाशीची बोंडे आदींचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन, तूर, मूग जागीच सडू लागले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी बाजरीच्या कणसांना कर्हे फुटण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी दिवाळीच्या आधीपासून सुकण्यासाठी टाकलेल्या सोयाबीनला पावसाच्या पाण्याने मोड आले आहेत.
रब्बीतील ज्वारी, हरभरा या पिकांची परीस्थिती सुधारत असल्याचेही चित्र आहे.
दरम्यान जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात सुमारे 1 हजार 519 गावांतील 3 लाख 64 हजार 14 हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र 3 लाख 24 हजार 643 हेक्टर तर 33 टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या 39 हजार 371 हेक्टर इतके नकसान झाले पावसाचा 1519 गावांना फटका बसला आहे.
जिल्ह्यात यावर्षी खरिपाची 5 लाख 91 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसामुळे यावर्षी पिके चांगली जोमात आली होती.मात्र ऐन हंगामाच्या सुगीच्या दिवसात जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी व अवकाळी झालेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 15-20दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हंगामातील पिकाची प्राथमिक पाहणी कृषी विभाग व महसूल विभागाने केली आहे.
या प्राथमिक पहाणीमध्ये जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 519गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीमध्ये 33 टके पेक्षा जास्त व 33 टक्के पेक्षा कमी अशी वर्गवारी करत अहवाल गुरुवारी जिल्हा पशासनाला सादर केला आहे. पुढील आठवडाभरात कृषी आणि महसूल विभाग शेतीच्या क्षेत्रानुसार पहाणी करून अंतिम अहवाल सादर करणार आहे.अतिवृष्टीने खरिपातील सोयाबिन, मका, बाजरी, कापूस, ऊस, भाजीपाला, कांदा, भुईमूग, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, भात, फळपिके व चारापिके यांचे नुकसान झाले आहे.