नगर – ग्रामपंचायतीने त्यांच्या ग्रामनिधीमधून प्राथमिक शाळांची वीजबीले भरण्यात यावीत असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीचे गटविकास यांना निर्गमित केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व राज्य उपसरचिटणीस कल्याण लवांडे यांनी दिली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांना निवेदन देऊन समक्ष चर्चा केली होती. संघटनेने जिल्हा वर्धा, सांगली सह राज्यातील अन्य जिल्हा परिषदांचे आदेशही निदर्शनास आणून दिले होते.
प्राथमिक शाळांना मिळणारी चार टक्के सादिल रक्कम शासनाने इतरत्र वळविल्यामुळे शाळांची वीजबीले थकल्यामूळे महावितरण कंपनीकडून वीजमीटर सुद्धा काढून घेण्यात आली आहेत. वीजबीले भरण्याच्या निर्णयामूळे शाळेमधील बंद पडलेले संगणक पूनश्च सुरू होऊन विद्यार्थी हे डिजीटल वर्गामध्ये अध्ययनाचे धडे समाधानाने गिरवू शकणार आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत या वर्षी कमी पटाच्या शाळांना मिळणाऱ्या तुटपूंज्या अनुदानामुळे वीजबिल भरणे मूळीच शक्य नव्हते. मात्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील व ग्रामपंचायत चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी ग्रामपंचायतने वीजबिले भरण्याचे आदेश काढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर यांनी सांगीतले.
या निर्णयाचे स्वागत राज्य उपसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्यसंघटक राजेंद्र निमसे, जिल्हा नेते सर्जेराव राऊत, रामराव ढाकणे, विष्णू बांगर, भगवंता लोटे, माधव गोडे, उत्तम शेलार, बाळासाहेब कदम, रामप्रसाद आव्हाड, सुनिल शिंदे, सुरेश नवले, संजय शेळके, दत्तात्रय परहर, विष्णू चौधरी, शकील बागवान, नामदेव बारामते, प्रदीप चक्रनारायण, शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे, मुकुंद सोनवणे, संजय सोनवणे, अश्पाक शेख, संदीप भालेराव, राजकुमार शहाणे, महेश लोखंडे, मधुकर डहाळे, सुखदेव डेंगळे, सुनिल दरंदले, रामदास लांघी, नामदेव धायतडक, रज्जाक सय्यद, शिवाजी नरवडे, सुनिल कदम, गणेश पोटे, लाजरस कसोटे, भारत शिरसाठ लक्ष्मण चेमटे, पांडुरंग देवकर, लहू फलके, निलेश भुजबळ, विलास लवांडे, ज्ञानदेव कराड, जनार्दन काळे, मच्छिंद्र कडाळी, बाळासाहेब जाधव, एकनाथ खामकर, सुनिल मोटकर, रविंद्र अनाप, शिवाजी नरवडे, दत्तात्रय बर्गे, राजेंद्र केदारी, सुधीर बो-हाडे, ज्ञानदेव उगले, संतोष ठाणगे, यशवंत पवार, आदिनाथ सातपुते, ज्ञानेश्वर शेळके, प्रमोद घोडके, शिवाजी माने, शहाजी शेळके, संभाजी तुपेरे, दत्तात्रय काळे, संदिप कडू, संगीता निमसे, उज्ज्वला घोरपडे दिपाली बोलके, संगीता बळीद, सुजाता पूरी आदींनी स्वागत केले आहे.