जगासह भारतात करोनाने कहर केल्यानंतर देशात मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात सर्व चित्रपटांचे शूटिंग बंद करण्यात आले. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून हळू-हळू कलाकारही कामावर वापसी करत आहे. त्यातच आता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी आपल्या आगामी “भूल भुलैया-2’चे शूटिंग लवकरच सुरू करणार आहेत.
अनीस बझ्मी यांनी शूटिंगसाठी अनेक प्लॉट यापूर्वीच बुक केले आहेत. यातच ऑक्टोंबरमध्ये मुंबईत सेट बनविण्यासाठी एखादी प्रॉपर्टी शोधणे अवघड काम आहे. कारण आता सर्व प्रोड्यूसर्स आपल्या चित्रपटाचे काम लवकरात लवकर पूर्ण करू इच्छित आहेत. त्यातच काही नवीन प्रोजेक्टस् देखील सुरू होणार आहेत.
अनीस बझ्मी म्हणाले, चित्रपटातील इनडोर सीन्स हे जास्तीतजास्तपणे मुंबईतच शूट करण्यात येईल. मुंबईतील शेड्यूल पूर्ण केल्यानंतर संपूर्ण टीम लखनौमध्ये काही आउटडोर सीन्स शूट करण्यासाठी जाईल. दिग्दर्शकांनी आशा आहे की, लवकरच एखादे लोकेशन निश्चित करून तेथे लवकरात लवकर सेट उभारण्याचे काम सुरू करता येईल.
कारण चित्रपटाचे 15 दिवसांचे शूटिंग अद्याप बाकी आहे. दरम्यान, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या “भूल भुलैया’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे.