मुंबई : कोरोना विरोधात भारतात लढाई सुरु आहे. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 834 च्या वर गेली आहे. तर 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच एका विद्यापीठाने भारताला धोक्याचा इशारा दिला आहे. येणारे काही महिने भारतासाठी कठीण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
हा अहवाल जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि द सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) यांनी तयार केला आहे. एका संकेतस्थळावर त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या या अहवालात असे सांगितले गेले आहे की, भारतातील कोरोना विषाणूची भीतीदायक लाट जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत संपेल. यात पाच राज्यांचा आलेख देखील दर्शविला आहे.
एप्रिलच्या मध्यापासून ते मे दरम्यान संपूर्ण देशातील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण होईल आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत ही संख्या कमी होत जाईल. हे ऑगस्टपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. या आलेखानुसार सुमारे 25 लाख लोकं या विषाणूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात येतील.
अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, भारतात किती लोक संक्रमित आहेत हे माहित नाही. कारण बरेच लोक एकविरहित असतात. याचा अर्थ असा आहे की तेथे कोरोना विषाणूची लागण होणारे बरेच लोकं आहेत. त्यांच्यात कोरोनाचं सौम्य लक्षणे देखील आहेत. म्हणूनच, जेव्हा ते तीव्र होतील तेव्हाच हे कळेल.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, वृद्ध जनतेबाबत सामाजिक अंतरांची जास्त काळजी घ्यावी लागेल. जितके अधिक लॉकडाऊन असतील तितके लोकं यापासून दूर राहतील. लॉकडाऊन हाच सध्या मार्ग आहे.