Shivsena – Sambahji Brigade Alliance – शिवसेना – संभाजी ब्रिगेड असं नवं राजकीय समीकरण जुळवून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडवून आणला. शिवसेनेच्या संभाजी ब्रिगेडसोबतच्या या युतीबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटाने शिवसेनेने चाललेल्या या चालीवर सडकून टीका केली आहे तर सेनेचे नेते याचं समर्थन करताना दिसतायेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सेना -संभाजी बिग्रेडच्या युतीवर भाष्य केलं आहे. पत्रकारांनी याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी खोचक टीका केली. फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘बंडखोर आमदार भाजपच्या स्क्रिप्टवर काम करतायेत’; अंबादास दानवे यांचा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा
“शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका कायम स्पष्ट राहिली आहे. ज्यांना आमची मतं, भूमिका पटली, ते आमच्यासोबत येतील. गेल्या अडीच वर्षांत देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच आधारावर एकत्र आलो आणि सोबत राहिलो. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल, ते सोबत येतील.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तत्पूर्वी, शुक्रवारी उद्धव ठाकरे याणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी, “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू” असं म्हणत युतीचं समर्थन केलं होत.
नितीन गडकरी स्पष्टच बोलले,”निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाही तर…”