रायगड – रायगडमधील माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघतात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमध्ये हा अपघात झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरूवात केली. तसेच, या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे. दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे अशी मृतांमधील दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथून दापोलीच्या दिशेनी जाणारी शिवशाही बस रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव नजीक आली असता शिवशाही बस आणि रिक्षामध्ये जोरची धडक बसली.
या अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. शिवाय, बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.