शिराळा (प्रतिनिधी) : आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करावा सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज मरिमी चौक येथे शिवसेनेने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन व निषेध केला.
याठिकाणी “छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला ” तसेच “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो”, “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत मिरिमी चौक शिवसैनिकांनी दणाणून सोडला.
शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरुगडे,युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल निकम,उपतालुकाप्रमुख सुरेश पिसाळ,निगडी गावचे उपसपंच अँड.सागर घोलप, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजीत दळवी, उपशहरप्रमुख महादेव माने, प्रकाश इंगवले,अक्षय कांबळे, अमर पाटील, सचिन नलवडे नाना उपस्थित होते.