नवी दिल्ली – भारतात 2022 साली होत असलेली महिलांची विश्वकरंडक स्पर्धा जिंकणे हेच प्रमुख लक्ष्य आहे, असे मत भारताच्या महिला संघाची प्रमुख गोलंदाज झूलन गोस्वामी हिने व्यक्त केले आहे.
पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये देखील विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यातही यश मिळविण्यसाठी मेहनत घेण्याची तयारी आहे. मात्र, 2022 साली होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकणे हेच प्रमुख ध्येय आहे. अर्थात त्यापूर्वी होत असलेल्या विविध स्पर्धांमध्येही सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. विश्वकरंडक स्पर्धेला अद्याप बराच कालावधी आहे, त्यामुळे त्यापूर्वीच्या सर्व स्पर्धांमध्ये आपल्या खेळातील चुका दूर करून तसेच सरावात या चुका टाळण्यासाठी आणखी मेहनत घेण्यासाठी सराव सत्र सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे, असेही तिने सांगितले.
आयसीसीने विश्वकरंडक 2022 साली होणार असल्याचा निर्णय घेतला हे एका अर्थी भारतीय महिला खेळाडूंसाठी अत्यंत चांगली बाब ठरणार आहे. या स्पर्धेसाटी मिळालेला हा अतिरिक्त वेळ लाभदायकच ठरणार आहे, असेही तिने सांगितले.
नवी गुणवत्ता मिळेल – स्मृती
बीसीसीआय येत्या काळात महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा आयोजित करणार असल्याच्या वृत्ताचे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाने स्वागत केले आहे. गेली अनेक वर्षे आम्ही अशी स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा करत होतो. देशात अफाट गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. महिलांच्या स्पर्धेतूनही नवी गुणवत्ता गवसेल, असेही तिने सांगितले.