मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सतत राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करून देखील आमदार आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसते आहे.
दुसरीकडे शिवसेना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भावनिक आवाहन केले. अशात यावेळी शिवसेना ठाकरेंच्या नावाशिवाय जगून बाहेर काढा, उद्धव ठाकरे यांनी गटातील सदस्यांना आव्हान केलं होत पण यांचा विरोध करत शिंदे गटाने एक मताने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ अस गटाचं नाव ठरवले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलतांना शिंदे गटाची भूमिका मांडली ते म्हणाले,”शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ हे नाव सर्वांनी एकमताने प्रचंड विचारा करुन ठरलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आम्हाला जायचं नाही. असही यावेळी ते म्हणाले आहे.