मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारले आहे. त्यांच्या सोबत अनेक आमदार आहेत. असे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे बंडखोर आमदारांना घेऊन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. शिवाय बंडखोर आमदारांचे कार्यालय शिवसैनिकांकडून फोडले गेले. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आमचे कटुंबीय सुरक्षित नसल्याचे म्हंटले होते. त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली असून एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही, आमदारांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देणार असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे गृहमंत्री पाटील यांनी दिलंय.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
काय म्हंटलं होतं एकनाथ शिंदे यांनी ?
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्या ट्विट ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही त्यांच्या कुटुंबाना महाविकास आघाडी सरकार संरक्षण देईल असे गृहमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. @Dwalsepatil
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 25, 2022