मुंबई – महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज्या राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलेले असतानाच भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून आता वातावरण तापले असून राजकीय वर्तुळासह जनतेतूनही पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आंदोलने करून पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर भाजपचा मित्र पक्ष असलेला शिंदे गटाने देखील पाटील यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे मंत्री तीपक केसरकर यांनी म्हंटले आहे की, सरकारला महापुरुषांबद्दल अभिमान असून, महापुरुषांबाबत कुणीही चुकीचं वक्तव्य करू नये.
चुकीचं विधान केलं असेल तर ताबडतोब माफी मागितली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्याशी मी याबाबत बोलणार आहे. ते निश्चितच याबाबत खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर दिली आहे.