नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असला तरीही हा दुय्यम संघ असेल असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. भारताचा वरिष्ठ संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसरा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
त्यामुळे भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे धवनचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत धवनचा विचार केला जाणार नाही,
असेही सुतोवाच बीसीसीआयने केले आहे. या स्पर्धेसाठी येत्या काही दिवसांतच संघ जाहीर केला जाणार आहे. धवनच्या नेतृत्वात संघात जास्तीतजास्त नवोदितांना संधी मिळू शकते.