गोंदवले – माण-खटावच्या दुष्काळी मातीतील दु:खे आणि ती दूर करण्यासाठी जे काही करावे लागेल, त्यासाठी शेखर गोरे तयार आहेत. येथील जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात ते यशस्वी होती. तालुक्यात स्वखर्चातून केलेल्या कामाच्या बळावर शेखरभाऊंनी जनतेच्या मनात घर केले आहे. त्यामुळे जनता, विशेषत: महिला वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून शेखरभाऊंना आमदार करायचेच, असा निर्धार महिलांसह सर्वांनी केला आहे. तुमचा उत्साह व प्रतिसादच भाऊंच्या विजयाची नांदी असून ते तुम्हाला आमदारकीच्या रूपाने दिवाळीआधीच भाऊबीज देतील, असा विश्वास सौ.सोनलताई गोरे यांनी व्यक्त केला.
अंबवडे, ता. खटाव येथील माताभगिनींशी त्यांनी संवाद साधला. सौ. सुरेखाताई पखाले उपस्थित होत्या. सौ. गोरे म्हणाल्या, येथील जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात शेखरभाऊ निश्चित यशस्वी होतील. आपल्या माथी पिढ्यान्पिढ्या लागलेला दुष्काळाचा कलंक येत्या काळात पुसण्यासाठी आणि आपल्या काळ्या आईला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी शिवसेनच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे. विरोधकांच्या भूलथापा व फसवेगिरीला जनता कंटाळली आहे. त्यांना “ऑन द स्पॉट’ कामे करणारा नेता हवाय. तेच काम शेखरभाऊ गेली सात वर्षे माण-खटाव मतदारसंघातील जनतेला आपले कुटुंब मानून करत आहेत. या कामाला अधिक बळ देण्यासाठी आपण त्यांना साथ द्यावी.
तुमच्या मुलाला, भावाला आशीर्वाद द्या
शेखरभाऊ मतदारसंघातील जनतेलाच आपले कुटुंब समजून रात्रंदिवस झटत आहेत. ते कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या जनतेला काही अडचणी येऊ नयेत म्हणून सौ. सुरेखाताईंनी जबाबदारी पेलली आहे. सत्ता नसताना तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी शेखरभाऊंनी ठेवली आहे. तुमच्या मुलाची, भावाची ताकद वाढवण्यासाठी मतांच्या रूपाने आशीर्वाद देऊन आमदार करा, असे आवाहनही सौ. सोनलताई गोरे यांनी केले.